बुधवार, ४ मार्च, २०२०
शिशिर आणि आनंद नवीन शिवसेना चालू करा आता....!!! असे बाळसाहेब का म्हणाले?
अभिनेता संजय दत्तच्या सुटकेसाठी ख्यातनाम सिनेनिर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या नेतृत्वाखाली सिनेताऱ्यांचा ठाणे जेलवर मोर्चा, पोलिसांचाही निषेध’ अशी बातमी त्या दिवशी पेपरात वाचली आणि सकाळी सकाळी माझ्या डोक्यात संतापाची सणक गेली. त्यावेळी मी पाठदुखीने बेजार होतो. त्यामुळे घरीच झोपून होतो. मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटानंतरची सकाळ होती ती. मला तो प्रसंग जस्साच्या तसा आजही आठवतो. अभिनेता संजय दत्त पोलिस कोठडी संपवून ठाणे जेलमध्ये गेला होता. त्याच्या सुटकेसाठी त्यावेळचा अतिशय टॉपचा निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई रस्त्यावर उतरला होता. मात्र या मोर्चावर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसैनिकांनी दगडफेक केली. दहाबारा गाड्या फोडून टाकल्या होत्या. सिनेतारे पळून गेले. हे सर्व वाचून मलाही खूप राग आला होता. हा सुभाष घई कोण लागून गेला? माझ्या आणि सुभाष घईंच्या त्यापूर्वी अनेकदा भेटी झाल्या होत्या. त्यांचा फोन नंबर मला पाठ होता. माझ्या घरातील लाल फोनवरुन मी त्यांचा नंबर फिरवला आणि शिवसेना शैलीत माझ्या आवाजाची धार लागली. मात्र हिंदीत!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल, तर मला त्यांचा अभिमान आहे.’ किंवा ‘तुम्ही दाऊदला पोसत असाल, दाऊद तुम्हाला तुमचा वाटत असेल, तर मग अरु...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा